अप्पासाहेब बेलवलकर हा एकेकाळचा गाजलेला नट. आता निवृत्त. घर मुलांना देऊन टाकतो आणि मग हळूहळू त्याच घरात परका होत जातो. कथा साधी आहे. तिचा परिणाम मात्र नाही.
भाषेचा जोर
कुसुमाग्रजांची भाषा इथे कवितेच्या जवळ जाते पण नाटकाची पकड सोडत नाही. स्वगतं वाचताना आवाजात वाचावीशी वाटतात, आणि तेच त्यांचं यश.
वाचणं की बघणं
नाटक रंगमंचावर बघावं असं म्हणतात, आणि ते खरंही आहे. पण नटसम्राटच्या बाबतीत वाचनाचा एक वेगळा फायदा आहे – तुम्ही थांबू शकता, मागे जाऊ शकता, आणि एक ओळ दोनदा वाचू शकता. इथे तशा बऱ्याच ओळी आहेत.
कुणी वाचावं
ज्यांचे आईवडील म्हातारे होत आहेत त्यांनी. आणि ज्यांना ते कधीतरी व्हायचंय, म्हणजे सगळ्यांनीच.