सगळी परीक्षणं

पुस्तक अर्ध्यात सोडून देणं ही चूक नाही

सुरू केलेलं पुस्तक संपवलंच पाहिजे हा नियम कुणी केला? आयुष्य लहान आहे आणि पुस्तकं खूप.

लहानपणी शिकवलं जातं की सुरू केलेलं काम पूर्ण करावं. ते बहुतेक गोष्टींना लागू होतं. पुस्तकांना नाही.

अपराधीपणा कशाला

शंभर पानं वाचूनही पुस्तक पकड घेत नसेल तर ते तुमचं अपयश नाही. कदाचित ते पुस्तक तुमच्यासाठी नाही, किंवा हा त्याचा काळ नाही. पाच वर्षांनी तेच पुस्तक जबरदस्त वाटू शकतं.

एक साधा हिशोब

वर्षाला तुम्ही तीस पुस्तकं वाचता असं धरलं तर पन्नास वर्षांत १५०० होतात. जगात दरवर्षी लाखो पुस्तकं छापली जातात. तुम्ही आधीच बहुतेक सगळं सोडून देताय. मग जे आवडत नाही तेच का ओढत बसायचं?

नियम एकच

सोडलेलं पुस्तक कपाटात परत ठेवा. फेकून देऊ नका. कट्ट्यावर याबद्दल भांडायला विषय हवा.

पुढे

हे संपलं? मग हे बघा

error: Content is protected !!